Wednesday, August 29, 2012

"आता खरच सवय झालीये....!

आता खरच सवय झालीये....!
"आता खरच सवय झालीये....!


एकट्यानेच चालायची,


आणि न सुटनारी कोडी स्वतःलाच घालायची.


सवय झालीये....


मनातल्या मनात रडायची,

आणि ठेच लागुन पडायची.


सवय झालीये....


आपल्या मानसापासून दूर जायची,

आणि डोळे भरून त्यांची वाट पहायची.


सवय झालीये....


जिंकत नसलो तरी हरायची,

आणि आयुष्य एक एक दिवसाने भरायची.


सवय झालीये....


स्वतःवरती रुसन्याची,

आणि नाव पुन्हा पुन्हा लिहून पूसन्याची.


सवय झालीये....


पोरक करणाऱ्या मायेची,

आणि उन्हात मला तडफडत सोडून जाणाऱ्या छायेची.


सवय झालीये....


त्याच त्याच शब्दाना फसन्याची,

आणि स्वतः स्वतःवर हसण्याची.


सवय झालीये....


जिवंतपनी मरायची,

आणि शेवट नसलेली सुरुवात करायची.


सवय झालीये....


स्वतःच्या अश्रुमधे सांडायची,

आणि तेच भिजलेले शब्द मांडायची.


आई शपथ,

आता खरच सवय झालीये...."
...........

मी मरेन तेव्हा.....

मी मरेन तेव्हा.....

मी मरेन तेव्हा, दोन क्षण मौन पाळशील का?
एकान्तात का होइना, पण माझ्यासाठी, दोन अश्रु गाळशील का?

माझ्या नावाचं मंगळसुत्र, तू नाही घातलं तरी;

माझ्यासाठी एक दिवस, तू वैधव्य पाळशील का?

जन्मभराची साथ, नाही मिळाली तरी चालेल;
पण माझ्या शवयात्रेत, तू दोन पावलं चालशील का?

माझ्यासाठी तू, कोमेजली नाहीसच कधी;
शेवटी माझ्यावर, तू दोन फुलं उधळशील का?

विचार करायला, उसंत मिळाली तर्;
माझ्या आठवणी कधी, उराशी कवटाळशील का?

मी मरेन तेव्हा, दोन क्षण मौन पाळशील का?.....

एकही क्षण नाही जेव्हा तिची आठवण येत नसेल,

एकही क्षण नाही जेव्हा तिची आठवण येत नसेल,
असा एकतरी क्षण असेल जेव्हा ती मला आठवत
असेल तू समोर असतेस तेंव्हा बोलू देत नाहीस तू
समोर नसतेस तेंव्हाझोपू देत नाहीस तो ढग बघ
कसा बरसण्यासाठी आतुरलाय तुझ्या चिंब
गालावरुन ओघळला म्हणुन थेंबसुद्धा आनं
दलाय
माझ्या शब्दांना अजुन तरी काहीच अर्थ नाही.
जोपर्यंत त्या गीताला तुझ्या ओठांचा स्पर्श
नाही. येणारा दिवस कधीच
तुझ्या आठवणीशिवाय जात नाही दिवस
जरी गेला तरी तुझी आठवणजात नाही. आज सारे
विसरली तू नावही न येई ओठांवर..... कसे मानू तू
कधी खरे प्रेम करशील कुणावर...... तेव्हा सागर
किनारी साक्षीने तू घेतल्यास किती शपथा.....
किती मारल्यास मिठया तू तो चंद्र ढगात
लपता........ नजरेत जरी अश्रू असले तरी ओठावर
हास्य असाव ओठावरच्या हास्यामागे
नजरेतल्या अश्रूना लपवाव.कसे करू माफ़ तुला जे
घाव तू मला दिले...... घेऊन माझी फूले तू काटेच
मला दिले...... डोळे पुसण्यास माझे पाऊस
धावूनी आला, थेंब कोणता तुझा नि माझा हेच
कळेना म्हणाला. आज पुन्हा तुझी आठवण
आली आणि मी उगीच हसु लागलो खोटं खोटं
हसताना... कळलेच नाही, कधी रडु लागलो...
तुझ्या नि माझ्या वाटा, एकमेकींशी नेहमीच
समांतर एकत्रच चालतात खर तर, पण मिटत
नाही अंतर मनातला प्रत्येक क्षण
ओठांवरती येईल का? ओठांवरील प्रत्येक शब्द
मनातच राहील का?

खात्री आहे की तू मला नक्की हो म्हणशील !

तुलाच माहित नाही तुझ्या हसण्यातजादू आहे ,
वेडं करेल एखाद्याला त्यात इतकी ताकत आहे,
तुझा ते सौंदर्य नझर खीळणारं आहे,
तुझ्या प्रेमात न पडणे खरच अशक्य आहे?
मनी आणि स्वप्नी तुझेच चित्र रेखाटतो,
गुलाबाच्या फुलाहून तुझा सहवास सुंदरवाटतो
चित्त माझं उडायला तूच कारणीभूत आहेस,
तुझी चूक नाही कारण हे होणं साहजिक आहे
तुझा चेहरा काही करून नजरे आड जातनाही ,
रात्री झोपू आणि दिवसा चैन देत नाही
तुला माहित नाही पण हे तुझ्यावरचा प्रेम आहे ,
कारण तुला हे समजणं खूप कठीण आहे
गुलाबी कागदावर लिहू का रक्ताने उमटवून देऊ ,
प्रेम करतो तुझ्यावर हे कसे तुला सांगू ?
मला नाही म्हण्याला तुला एक सेकंद लागेल ,
पण मला त्यातून सावरायला हा जन्म कमी पडेल
माझी हीं अवस्था तू नक्की समजून घेशील,
खात्री आहे की तू मला नक्की हो म्हणशील !

च्यायला !!!! मी काय खोटे बोलतोय काय!!!

च्यायला, प्रेम म्हणजे असतं काय,...........
च्यायला, प्रेम म्हणजे असतं काय,
खाली डोके वर पाय,
नुसताच गोंधळ, कल्लोळ सारा,
बोला मी खोटे बोलतोय काय!!!!


पण प्रेमात असं व्हावचं लागतं,
थोडसं हसावं अन थोडसं रडावंच लागतं,
धरलं तर चावतं, सोडलं तर पळतं,
बोला मी खोटे बोलतोय काय!!!!

ती दिसली तरी त्रास,नाही दिसली तर दुप्पट वैताग,
आपल्याला मग काही सुचत नाही, मग ती आल्यावर चुप बसताच येत नाही.
बिचारी मान खाली घालुन शिव्या खाते, स्वतःची चुक मान्य करते,
खरतर तिला दुखवावेसे मला मुळीच वाटत नाही, पण तिचे अश्रु पिल्याशिवाय आपल्याला बरेच वाटत नाही.
अरे दोस्तहो, तुम्हाला काय वाटलं मी फ़ेकतो,
च्यायला !!!!
मी काय खोटे बोलतोय काय!!!

दिवस असे सरून गेले तुटलं होतं अंतर

विसरली नसशीलच तू ती खुळावलेली वेळ
ऐन भरात आला होता उनपावसाचा खेळ
त्या स्वप्निल चांदण्यात मी उभा पेटलो होतो
आडवयातल्या वाटेवर जेव्हा चोरुन भेटलो होतो
आठवतायंत का तुला आपल्या नजरांमधील कोडी


प्रश्न होते खूप पण वेळ होती थोडी
माझ्यापेक्षा तू माझ्या शब्दांवर भाळली होतीस
मनात होती वादळं पण अबोली माळली होतीस
आठवतायेत का तुला ते धुंदावलेले गंध
शपथांच्या खेळातले ते लोभसवाणे छंद

एकांतीचे शब्द शांततेनी खोडले होते
जसे मेघांनी ग्रीष्माचे संसार मोडले होते
मग एकदा असाच तू केला होतास फोन
मौनाच्या पडद्याआड रडलं होतं कोण?

मी रडलो नाहीच फक्त हसलो खिन्न
व्यथा होती एकच पण कथा होत्या भिन्न
पत्त्यांचा बंगलाच तो कधीतरी पडणार
एक खड्डा बुजवायला दुसरा खड्डा पडणार
आता जपून ठेव हे आयुष्यभराचं वाक्य
नियतीचं प्रेमाशी जमत नाही सख्य

अक्षता झेलत झेलत संसारात रमायचं
टाचांना कुरवाळत नभाशी बोलायचं
मळभ होईल दूर विरून जातील मेघ
आकाशीचे ग्रह घेतील पुन्हा वेग

दिवस असे सरून गेले तुटलं होतं अंतर
तात्पर्य नसतं अश्या कथेला कधीच नसतो 'नंतर'
हळद मेंदी, सनई तिघी एकत्र नांदल्या
कवितेनं व्यथा सा-या सहीपाशी सांडल्या ...!